सोमवार, ३ डिसेंबर, २०१२

माझी कविता : प्रिया...


कासावीस होते आहे मी 
तुझ्या काही शब्दांसाठी .......
माझ्याच चुकांसाठी 
मलाच आहे शिक्षा हि......
फक्त तुझीच आहे मी 
हे  कसे पटवून देऊ मी......
तुझ्याचसाठी  झुरते आहे मी
क्षण  क्षण  मरते आहे   मी......
बोल  ना   रे  एकदाच  
किंतु  नको ठेऊ कुठलाच......  
नाही समजू शकले मी तुला
येतो आहे स्वतःचाच  राग मला.....
जाऊ दे नको बोलू
होऊ दे सवय तुला याचीही......
मला दूर लोटल्यावर
कळेल मलाच किंमत याची.......
तू नको ठेऊ खंत याची
पुसून टाक हि आठवण कालची......

माझी कविता : असं जगावं कि...


असं जग कि तुझं असणं,
एखाद्यासाठी आयुष्य होईल  ...
असं जग कि तुझं मरणं,
एखाद्याला कठीण होईल...
असं हस कि तुझं हसण,
एखाद्यासाठी संजीवनी देईल...
असं रड कि तुझं रडण,
एखाद्याच हृदय कातर करेल...
असं बोल कि तुझं बोलण,
एखाद्याला साखरेपेक्षा गोड वाटेल...
अशी नाती जोड कि,तुझं नात  
समोरच्याला तोडन कठीण होईल...
असं लढ कि,  तुझा लढा
इतिहासात अमर होईल...
असं विश्वास सम्पादन कर कि
अविश्वासाच नावच लोपेल...
अशी गर्जना कर कि 
सिंह तुला डरकाळीने  मुजरा करेल...
असं कोमल बन कि,
गुलाब देखील तुला पाहून लाजेल... 
अश्या उंचीवर जा कि,
हिमालयही तुला  ठेंगणा होईल...
असं  मरण याव कि,
जाताना स्मृति हृदयात ठेवता येतील
आणि.. असं  जगावं  की ,
आपल आयुष्य एखाद्याला जगायला शिकवेल !!